सोमवार, ५ सप्टेंबर, २०११

माहिती अधिकार अधिनियम 2005 चा वापर - अनुभव लेखन स्पर्धा – 2011.

माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी दि. 12 ऑक्टोबर 2005 पासून सुरु झाली.  या कायद्याबाबत व्यापक जनजागृती व्हावी, शासन व्यवस्थेत माहितगार नागरिकांचा सहभाग वाढावा तसेच पारदर्शकता व उत्तरदायित्वाची प्रक्रिया सुरु व्हावी यासाठी केंद्र शासनाने दरवर्षी दि.6 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत माहिती अधिकार सप्ताह साजरा करावा अशा सुचना दिलेल्या आहेत. 

    माहिती अधिकार सप्ताह 2011 निमित्त केंद्र शासनाचे Department of Personal & Training चे Central Sector Scheme on ‘Improving Transparency and Accountability in Government through Effective Implementation of RTI Act 2005.’ या योजने अंतर्गत यशदामार्फत खालील उपक्रम राबविण्यात येत आहे. 

माहिती अधिकार वापर अनुभव लेखन स्पर्धा :-  ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून माहिती अधिकार कायद्याच्या वापर/अंमलबजावणी करतांना आलेले अनुभव पुराव्यासह लिहून पाठवावयाचे आहेत.

Regional Workshop on Best Practices & Success Stories in RTI:- ही कार्यशाळा दि. 8 ऑक्टोबर 2011 रोजी यशदा येथे घेण्यात येणार आहे.  यामध्ये भाग घेण्यासाठी अधिकारी/ कर्मचारी, नागरीक, स्वयंसेवी संस्था व माध्यमे इ. पैकी कोणालीही आपले Best Practice व Success Stories पेपरच्या स्वरुपात लिहून प्रथम सादर करावे लागतील. सोबत उजव्या बाजूला लिक्स पहा.

या दोनही स्पर्धांसाठी आपले अनुभव अथवा पेपर्स सादर करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2011 अशी आहे.

या बाबतचा सविस्तर तपशिल सोबतच्या दोन प्रसिध्दी पत्रकात दिलेला आहे.  तसेच तो यशदाच्या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  तरी कृपया वरील दोनही प्रसिध्दी पत्रके आपल्या सुचना फलकावर लावून प्रसिध्द करावीत.  तसेच आपले कार्यालयातील व आपले आसपासचे अधिकारी/कर्मचारी, नागरीक यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी संधी उपलब्ध करुन द्यावी ही विनंती.

यशदा संकेतस्थळ - www.yashada.org
पत्ता:- प्रकल्प अधिकारी तथा संशोधन अधिकारी
         सार्वजनिक धोरण केंद्र, यशदा,
         राजभवन आवार, बाणेर रोड,
         पुणे 411007.